
कर्जत तालुक्यातील राशीन येथील महात्मा फुले फाउंडेशनचे अध्यक्ष कुंडलिक लक्ष्मण सायकर यांचे चिरंजीव ॲड. मोहन कुंडलिक सायकर यांनी नुकतेच वकिली क्षेत्रात पदार्पण केले आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या लॉ कॉलेजमधून एलएलबीची डिग्री घेतली आहे. पूर्वी मोहन सायकर हे पैलवानकी क्षेत्रात अग्रेसर होते. शालेय तसेच युनिव्हर्सिटीच्या स्पर्धांमध्ये राज्य पातळीपर्यंत क्रमांक मिळवलेले आहे. तसेच ते सामाजिक कार्यातही सतत अग्रेसर असतात. ते कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचे, देव, देश आणि धर्माच्या कार्यासाठी सदैव तत्पर असलेले आहेत.

तसेच लिंबाजी दत्तू साळवे यांचे चिरंजीव अविनाश लिंबाजी साळवे यांचे शिक्षण बीएससी आणि एमबीए झाले आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सखोल अभ्यासक आंबेडकरी चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनीही नुकतेच वकिली क्षेत्रात पदार्पण केले आहे.

ॲड. मोहन सायकर आणि ॲड. अविनाश साळवे हे दोघेही वेगवेगळ्या विचारसरणीचे असूनही जिवलग मित्र आहेत.
या दोघांनीही वकिली क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे त्यांचे कर्जत तालुक्यात व राशीनमध्ये कौतुक केले जात आहे. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी