कोटा मेंटॉर्सच्या श्रीकांत कदम याची इंजिनीयरिंग आयआयटीसाठी निवड

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील नावाजलेल्या कोटा मेंटॉर्स महाविद्यालयामध्ये शिकत असणारा श्रीकांत संदीप कदम यांची भारतातील सर्वोच्च इंजिनीयरिंग आयआयटीसाठी निवड झाली आहे.

श्रीकांत कदमने जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने हे यश संपादन केले आहे. या महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि अत्याधुनिक शिक्षण पद्धती यामुळे त्याला यश मिळणे शक्य झाले आहे. या यशाबद्दल कोटा मेंटॉर्सचे संस्थापक अध्यक्ष केशव आजबे यांनी श्रीकांतचे अभिनंदन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल कर्जत तालुक्याचे नाव उज्वल झाले असून तो इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. कर्जत तालुक्यातून व परिसरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. त्याच्या या यशामुळे कोटा मेंटॉर्स शाळेचे प्राचार्य, शाळेतील मार्गदर्शक शिक्षक आणि श्रीकांतचे पालक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. श्रीकांतच्या या यशामुळे कोटा मेंटॉर्स महाविद्यालयाने आपली छाप उमटवली आहे.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी