महेश सटाले यांची आम आदमी पार्टीच्या युवा कार्यकारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

आम आदमी पार्टीची राज्यस्तरीय आढावा बैठक आज पुणे येथे पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महेश सटाले यांची आम आदमी पार्टीच्या अहिल्यानगर युवा कार्यकारी जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्राचे प्रभारी प्रकाश जरवाल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित फाटके, पक्षाचे प्रवक्ते मुकुंद […]

Continue Reading

मराठा समाजातील स्थानिक नेतृत्वाला अपेक्षित स्थान मिळाले नाही

कर्जत–जामखेड मतदारसंघातील मराठा समाजात गेल्या काही वर्षांपासून राजकीय नेतृत्वाच्या प्रश्नावर अस्वस्थता आणि नाराजी व्यक्त होत आहे. गावपातळीवर भांडणे, जातीपातीचे राजकारण आणि स्वतःच्या आडनावाला मोठेपणा देण्याची स्पर्धा वाढल्याने समाजाची एकजूट कमकुवत झाल्याची भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर स्वतःला बादशहा म्हणवून घेण्याची प्रवृत्ती वाढली असली तरी समाजाचे एकत्रित नेतृत्व मात्र कमी होत […]

Continue Reading

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शिंदे येथील विजेचा प्रश्न मार्गी

कर्जत तालुक्यातील शिंदे येथे वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन तोरडमल आणि कुळधरण गटाचे शिवसेना प्रमुख किरण घालमे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून अवघ्या दोन दिवसांत वाफा डीपी बसविण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे परिसरात काही दिवसांपासून वीज पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः शेतीसाठी आवश्यक […]

Continue Reading

मार्चपूर्वी हेल्थ इन्शुरन्स घ्या ; प्रीमियम २० ते २५ टक्के वाढण्याची शक्यता : महेंद्र बागल

आरोग्य सेवांच्या वाढत्या खर्चामुळे येत्या काळात हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बागल सर्विसेसचे महेंद्र बागल यांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी मार्च महिना संपण्यापूर्वी आपल्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आरोग्य सेवांचा खर्च सातत्याने वाढत असल्याने विमा कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढत आहे. तसेच हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटीमध्ये […]

Continue Reading

मिरजगावमध्ये नायटा व गजकर्ण मुक्त अभियानाचे आयोजन

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील डॉ. संतोष संभाजी बोरुडे यांच्या ओम हॉस्पिटल येथे नायटा व गजकर्ण मुक्त अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान बुधवार दि. ४ मार्च ते ६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत होणार आहे. या शिबिरामध्ये नायटा, गजकर्ण, तोंड येणे तसेच विविध त्वचारोगांवर अत्यंत अल्प दरात उपचार उपलब्ध […]

Continue Reading

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून कुळधरण गटातील शाळा होत आहेत डिजिटल

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिकर पद्धतीने शिक्षण घेता यावे तसेच शहरी भागातील शिक्षण पध्दती ग्रामीण भागात यावी याच उद्देशाने व सभापती प्रा. राम शिंदे यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाण असल्याने यापूर्वीच कर्जत तालुक्यातील अनेक शाळांमध्ये डिजीटल पॅनल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान कुळधरण भागातील अनेक शाळांमध्ये डिजीटल पॅनल मिळाले नव्हते ही बाब वेळोवेळी लक्षात आणून […]

Continue Reading

सरपंच ते विधान परिषदेचे सभापती : संघर्ष, निष्ठा आणि जनसेवेचा प्रेरणादायी प्रवास

सरपंच ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती असा उंच भरारी घेणारा प्रवास म्हणजेच नामदार रामजी शिंदे साहेब. कोणताही राजकीय वारसा नसताना चोंडीसारख्या छोट्या गावात जन्म घेतलेल्या एका सामान्य सालकऱ्याच्या पोटी जन्मलेले रामजी शिंदे साहेब आज महाराष्ट्राच्या उच्च सभागृहाचे सभापती म्हणून राज्याच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवत आहेत. हा प्रवास म्हणजे संघर्ष, जिद्द, निष्ठा आणि समाजसेवेचे जिवंत […]

Continue Reading

कर्जत- जामखेडमधील तुतारी मोकळी करणार : सुनील यादव

भारतीय जनता पक्षाचे निमंत्रित सदस्य सुनील यादव यांनी रोहित पवार यांच्या विरोधात जोरदार टीका केली आहे. यादव यांनी म्हटले आहे, पाच – सहा वर्षांपूर्वी निलेश घायवळ आणि सचिन घायवळ हे रोहित पवार यांच्यासोबत होते. परंतु एका खोट्या प्रकरणात या दोघांवर खोटे आरोप करून त्यांना बदनाम केले गेले. हे दोघे सभापती राम शिंदे यांच्या संपर्कात गेल्यानंतर […]

Continue Reading

पुरोगामित्वाचा बुरखा : बोलण्यात प्रकाश, वागण्यात अंधार !

आज अनेकजण स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवून घेतात. पण खरे पुरोगामित्व फक्त बोलघेवडेपणात नसते तसेच ते घोषणांमध्ये किंवा कोणाला विरोध करण्यात नसते. विशेषतः राजकीय क्षेत्रात असलेल्या अनेकांकडून फक्त हिंदुत्वाला विरोध करणे म्हणजे पुरोगामी, असा भ्रम तयार केला जात आहे. त्यावरच त्यांची राजकीय दुकानदारी चालत असल्याचे दिसते. पुरोगामी विचार म्हणजे विचारपूर्वक, विवेकाने आणि समाजहिताच्या दृष्टीने आधुनिकतेची वाट धरून […]

Continue Reading

माणसं ओळखण्याची कला !

दररोज आपण अनेक माणसांना भेटतो. काही हसतात, काही मदत करतात, काही फसवतात. सर्वांच्या चेहऱ्यावर असलेले भाव, बोलण्यातला गोडवा, वागणुकीमागचे हेतू हे खरे असतातच असे नाही. कुणी आपलं होऊन आपल्या भावनांशी खेळतं, तर कुणी शांतपणे आपल्यासाठी खंबीरपणे उभं राहतं. खरं तर, माणूस ओळखणं ही एक कठीण पण अत्यावश्यक कला आहे. ही कला शिकली नाही, तर आयुष्यात […]

Continue Reading