अहमदनगर दक्षिण येथील दिलीप गांधी गेल्यापासून. आपल्याला नवीन खासदार आले आहेत. हे आल्यापासून दक्षिण मधील सर्वच तालुक्यांमध्ये त्यातून कर्जत जामखेड मध्ये जास्तच गट तट सुरू झाली आहेत. आणि हे गट खासदार साहेब आल्यापासून हे गट नेमके कुठून आणले आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी मध्ये हे आल्यापासून वेगळेच वातावरण झाले आहे आणि हे गट आता पाच वर्षापासून पडले आहेत. खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या गटाने. भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व राडा करून टाकला आहे. गेल्या विधानसभेच्या वेळेस सर्व अहमदनगर दक्षिण मधील सर्व विद्यमान आमदार 2019 मध्ये का पडले उलट खासदार साहेब आल्यानंतर जास्त आमदार वाढायला पाहिजे होते पण हे आल्यापासून सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये उलटा खेळ झाला आहे.
Non Edited News
आणि आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये तेच केले तसेच जामखेड मार्केट कमिटी मध्ये राष्ट्रवादीच्या लोकांना सहकार्य केले कर्जत मध्ये तसेच केले. फसवापस्वी गद्दारी जास्त दिवस चालत नसते आता सर्व जनतेने तुम्हाला पूर्ण ओळखलं आहे कर्जत तालुक्यामध्ये पंचवीस पंधरा चे काम व अजून इतर काही भारतीय जनता पार्टीच्या बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व इतर पदाधिकारी यांना कुणालाच न देता राष्ट्रवादीच्या लोकांना दिली आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आज जरी तुमच्याबरोबर दिसत असले ते मनापासून तुमच्याबरोबर कोणी नाही. तुमचे सर्व टीम गोड बोलून सर्वांचा कार्यक्रम करीत आहेत.
तुम्ही जे राष्ट्रवादीचे लोकांना काम दिली आहेत ते लंके साहेबांना सोडून तुम्हाला मतदान करतील का. आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्रास दिल्यामुळे ते सुद्धा तुम्हाला मतदान करतील का. काही मोजके पदाधिकारी जरी तुमच्या बरे असले. तरी जनता आज तुमच्याबरोबर नाही मी सर्वांची चर्चा सर्व ग्रुप वर लोक काय बोलत आहे ते मी सर्व पाहत आहे. त्याच्यामुळे इथून मागचे जे सर्व डाव पेच केले आहेत हे सर्व तुमच्याच अंगलट आले आहेत.
आम्ही पक्षाबरोबर आहोत तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते ते काय सांगतील तसे आम्ही करणार आम्ही आम्ही तुमच्या बरोबर आहोत लोकांची चर्चा आहे म्हणून मी ही बातमी करीत आहे इथून पुढे तरी तुमच्या मध्ये सुधारणा झाली पाहिजे.
सुनील यादव, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा.